बऱ्याच वेळेला असं होतं असतं.

बऱ्याच वेळेला असं होतं असतं…

हाताशी असलेली गोष्ट सापडत नाही ,
पण बालपणीच्या गोष्टी मात्र विसरत नाही…

काल काय खाल्लं ते आठवत नसतं,
पण आईच्या पदार्थाची चव मन मात्र स्मरत असतं..

रोज पाहूनही नेट वर काय वाचलं विसरलं जात,
अंतू बर्वा पु लं चा आहे हे मात्र मनात ठसलेलं असतं…

काळ्याभोर डोई वरती पांढरा केस कधी डोकावला कळलेलं हि नसतं,
पण कृष्ण धवल चित्रपटातील यमुना जळी गीत मात्र मुखी कायम तरळत असतं…

पाहिलेलं कार्टून, विसरलं जातंच,
पण बोक्या सातबंडे बरोबर अजूनही मन खेळतं…

नववर्षाचे करताना स्वागत,
मागचं वर्ष मागच राहत,

पुढे जातानां..असंच काहीसं विसरत असतं…काही आठवत राहतं…

काव्यरचना लिखाण,
अनुजा पडसलगीकर 

2 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Prabhakar pathade
    डिसेंबर 30, 2017 @ 14:27:00

    Aanujaji……..dhanyawad.
    Tumchi aantarmanatil sahajachi kreeya
    Vh tyacha tumhi ghetalela vedh surekhach aahe.
    Aagdi anpeshipane tuchi hi website milali. Utsulte wachali.khupach bhavale.
    Lihit rahaa. N thakata………
    Pratisadachi aapekshe shivay…….
    Bhetatil aamchyasaarakhe…………
    Anpekshi shabdbhav premi…….
    Harkhun janare…….

    उत्तर

यावर आपले मत नोंदवा