विसरलेली तारीख………..

विसरलेली तारीख………..

तिच्या नवीन नोकरीचा पहिला दिवस म्हणून वडिलांनी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जाण्याचे ठरविले. ह्रदयाच्या आजाराने निवृत झाल्याबरोबर डोके वर काढले. कन्येची नोकरी हे त्यांचे स्वप्न पूर्ण होत होते.समजूतदार,मनमिळाऊ,कर्तबगार जावई मिळाला, नातू बागडायला लागला, लहानीची छकुली, ह्यांचात रमण्याची वेळ. मुलाचे करियर बहरताना पहायचे होते. आई शी निवांत गप्पा करायच्या होत्या. असे मनसुबे वडिलांनी निवृत्त होईन तेंव्हा रचले होते. फार मोठ्या हुद्द्यावर काम केले. निवांत आयुष्य रेखाटले होते. एक हि दिवस विष्णू सहस्त्र नाम शिवाय गेला नाही.

संसार व परमार्थ ह्यांची सांगड उत्तम घालून प्रपंच नेटका केला. पण नियतीचा डाव वेगळा होता. हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या दिवशी आय. सी. यु. त्यांना ठेवले गेले. लेकीचे जाणे सुरु झाले. तिच्या नवीन नोकरी बद्धल हितगुज करीत होते. वडिलांचा वाढ दिवस आला. तिने त्यांना शुभेश्च्या पत्र दिले. आवर्जून नातवंड आली म्हणून केक आणवून घेतला.आबा, आबा करीत तीही रमली. उपचार करता करता दोन महिने झाले.

एक दिवस त्यांची तब्येत खालावली. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. घरची व्यवस्था हादरली कोण कोणाची समजूत काढणार? धीर गोळा करून सगळे जमले. नातवंडाचा पापा घेतला. पण त्यांची कन्या मात्र शून्यात नजर लावून बसलेली पहिली. आय. सी. यु. त थांबता येत नाही. म्हणून सर्व खाली त्यांच्या खोलीत बसली. थोडा थोड्या वेळ आई,ती,भाऊ,बहिण, जाऊन येत होते. तपासण्या सुरु होत्या. लेक बाबां पाशी गेली. वडीलांनी तिचा हात घट्ट हातात धरला व म्हणाले,” माझी जाण्याची वेळ आली” लेक भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. हे अश्रू पण नको त्या वेळी डोळ्यात येतात व ते पुसण्यासाठी डोळे बंद होतात व आपले माणूस क्षणभर दिसत नाही.
मला जाऊदे बाळा. विष्णू नेण्यासाठी आले आहेत. वर बघ किती सुरेख रथ आणला आहे. तुझी कार कशी मी खिडकीतून पहिली होती तसाच सुंदर रथ आहे.नमस्कार कर. लेकीने वर पाहून नमस्कार केला तिला बाबांचे विष्णू वरचे अगाध प्रेम माहिती होतेच पण बाबांच्या वाक्यांवर प्राणापेक्षा जास्त विश्वास होता . बाबा ते नंतर येणार नाहीत का? वेडाबाई, ज्याचे मी आयुष्यभर नाम घेतले त्यांना माझ्या स्वार्था करता परत पाठवले तर यम येईल. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा अडकेन. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यालाही मी हवा आहे. नारायण परत जातील हि, पण मला पुन्हा दिसणार नाहीत. बाबांचे ऐकतेस न बेटा.मला जाऊ दे. ती नाही नाही म्हणत होती, मी आईला बोलावते. नको जगत नियंत्र्याला आपण थांबवणे योग्य नाही. बाबा पुन्हा भेटाल का? हाक. मारली तर दिसाल का? स्वप्नात येऊन गप्पा कराल का? लेक प्रश्न विचारून भंडावत होती. मी विष्णू च्या चरणा पाशीच आहे. माझे देवाचे काम झाले कि तुझा हा हट्ट पूर्ण करीन.

कन्येला देवाची गोष्ट सांगत होते. तिला समाधान कसे मानावे ते शिकवत होते. वडिलांचा मृत्यू सकारात्मक घेण्यासाठी तिला तयार करीत होते. तिच्या जीवना करिता, संसारा करिता, माहेर करिता तिचाच आधार तिला देवून भक्कम करीत होते. निरोप घेत नव्हते तर जीवन शिकवत होते. हृदयाच्या वेदना काळजाच्या तुकड्याकरिता पण ठेऊन जात नव्हते. वडिलांना यमाच्या ताब्यात कसे द्यावे लेकीला प्रश्न पडला. विष्णू ला स्वीकारत ‘ह्नं’ असा उच्चार निघाला. लेकीच्या डोक्यावर हात ठेवून बाबांनी डोळे बंद केले. ती शांत पणे बाहेर पडली. आईचा आकांत तिला पाहवत नव्हता पण कितीही संकट आले तरी ती आता एकटी नव्हती. विष्णू स्थाना वरून तिचे बाबा तिला पाहत होते. तिला कधीही स्वप्न पडले नाही, कि तिला कधी बाबा दिसले नाहीत. एकच समाधान होते कि तिच्या मूळे बाबा देवापाशी पोहचले, यमा पासून तिने त्यांना वाचवले. बाबांची कन्या, त्यांची मृत्यू ची तारीख पण विसरली. दर वर्षी आईला विचारते आई बाबा २३ ऑगस्ट ला गेले का २४ तारखेला. कारण ह्या गोष्टीला १० वर्ष झाली. एक हि दिवस ती वडील नाहीत हे लक्षात ठेवत नाही. फक्त त्यांचा वाढदिवस ११ ऑगस्ट चा साजरा करते. योगायोगाने तिच्या सासऱ्यांचा म्हणजे तिच्या बाबां चा पण वाढदिवस त्याच तारखेला आहे.लेक आता सासरी बाबां करिता जाते.

देव आहेत का? यम आहे का? ह्या गोष्टीना महत्व नाही. लेकी साठी मात्र बाबा सकारत्मक दृष्टीकोन देवून गेले. अशी विसरलेली तारीख, असा निरोप, नव्हे तर अशी जीवनाची नव्याने करून दिलेली ओळख.

अभ्यासाच्या नावाने ………………

अभ्यासाच्या नावाने ………………

चार दिवस नेट नव्हते म्हणून कधी नव्हे ते बऱ्याच वेळ टीव्ही समोर होते. आज पोस्ट चे नाव पूर्ण लिहू शकले नाही. खूप दिवस मनात रेंगाळत होता विषय, तशी मी सुरवात दम दमा दम……पोस्ट (सहजच ब्लॉग वर आहे) ने केली होती. परंतु अस्वस्थता होतीच. त्याचवेळी मी टी. व्ही. वर पाहिले कि, महेश मांजरेकरचा ‘शिक्षणाचा आयचा घो’ नवीन सिनेमा येतोय.

मला अजूनही आठवते, अल्यूमिनीअम ची पत्र्याची पेटी, किंवा पिवळे दप्तर, कडीचा दोन कप्प्याचा खाऊचा डब्बा, कितीतरी सेंटी…….भावनिक गोष्टी जुडलेल्या आहेत. शाळेचा प्रत्येक कोपरा एक पोस्ट होऊ शकते. आठवणींचे ठीक आहे हो आपल्याकडे त्या आहेत, पण आता शाळेतील विद्यार्थी मला किंवा तुम्हाला बघणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. जड जड स्याक्स पाठीवर, पाठीचे धनुष्य झालेले, पाय ओढत, शाळेकडे जाताना दिसतात. काय आठवणी घेऊन ते बाहेर पडतील? शिक्षण, शाळा म्हटले की आमची लेखणी सरसावली म्हणून समजा. पूर्वी पण पुस्तके होतीच, अभ्यास ही असायचाच, पण दडपण कधी जाणवले नाही.

एकेदिवशी लेकाने मला प्रश्न विचारला, ”आई, तुला शाळेचे खूप कळते ना मग असा देश शोधून दे की, ज्या शाळेत इतिहास भूगोल चे प्रोजेक्ट असतील, पेपर नसेल. मी मोठा झालो की त्या देशात नोकरी शोधेन. माझ्या मुलांना मी हा त्रास होऊ देणार नाही” समाज शास्त्राची शिक्षिका मी हतबल झाले. मी कमी पडले का शिकवायला? इतिहास तर मी त्याला गोष्टी सारखा शिकवला, भूगोल तर माझाच विषय. छे! मी नाही कमी पडले. आज २० वर्ष होतील मी शिक्षिका होऊन, मग हा असे का बरे बोलला? गुणात मोजायचे तर २ ते ४ इतकेच गुण कमी असतात. पण ह्या विषयांची उदासीनता खूप आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर खूप खोल रुजलेली आहे. त्याचाच परिणाम मुलांना भोगावा लागतो. मुलाची नावाजलेली सी. बी. एस. सी शाळा आहे. शाळेत मी पण काही काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे.

१) सध्या फळ्यांच्या ऐवजी स्मार्ट इलेक्ट्रोनिक बोर्ड आहेत. शिक्षिका जागेवर इलेक्ट्रोनिक पेन्सिलीने लिहिते, बोर्ड वर आपोआपच उमटते. शिक्षकांचे खूप परिश्रम कमी होतात.
२) आठवड्याचा अभ्यासक्रम पालकांना त्यांच्या ई.मेल वर पाठवला जातो.
३) विषयां नुसार दृक श्रवण फिती दाखवल्या जातात.
४) सुसज्ज संगणक वर्ग आहे, जिम आहे, तरणतलाव आहे, शाळेचे डॉक्टर आहेत.
५) सध्या दहावीला मुलांना लॉकर उपलब्ध आहेत,ज्यांची एक चावी वर्ग शिक्षक कडे असते.

अशा अनेक सुसज्ज शाळा मॉल प्रमाणे, भरपूर फी घेऊन भारतात पण आहेत. मुले खुश ठेवण्याचा प्रयत्न. शाळेत शिक्षक पण उच्च विद्याभूषित अनुभवी असतात. ह्या मलम पट्या, मूळ दुखणे जात तर नाहीच, तर ते अधिक दुख:कारी, ठरतात. वरील पैकी काहीतरी बाबी महापालिकेच्या शाळेत करता येण्याजोग्या आहेत. बोर्ड आता नाही तरी परीक्षा आहेतच की, काही विषय प्रयोगशील ठेऊन त्याचे मूल्यमापन करावे. दुःख रहाते याचे कि, विद्यार्थ्यांना ते घोकून निरर्थक पणे पाठ करून जावे लागते. शिक्षण मंत्री सुशिक्षित हवेत निदान शिक्षक तरी द्वि पदवीधर हवा तर समाज शास्त्र हे प्रोजेक्ट द्वारे कसे शिकवता येते इतकी डेप्थ त्याच्या, ज्ञाना करता तयार होते. शाळा कितीही सुसज्ज असली तरी पुस्तकांचे ओझे, अकारण वह्या, ते तरी कमी करणे शक्य आहे.

समाज शास्त्र शिकवा पण ते प्रोजेक्ट चे माध्यम करून. बाबर ला किती मुले ह्याचा संगणक युगात कितीसा उपयोग? जगात भारतीय बुद्धिमान म्हणून, भारतीय शिक्षण स्तर उच्च प्रतीचे आहे. हि अभिमानास्पद बाब आहे मग हाच भारतीय कॉर्पोरेट जगात स्ट्रगल करताना दिसतो. कारण शिक्षणाच्या ह्या अकारण वाढवलेल्या ओझ्यामुळे, दडपणामुळे.
मला लेकाने असा प्रश्न का विचारला त्याचे उत्तर मिळाले. अकारण वाढवलेल्या पाठांमुळे मुले कंटाळतात व उदासीनता वाढू लागते. शिक्षण पद्धती शासन स्तरा पासून बदलली पाहिजे. नुसते अद्यावत शाळा निर्माण करून होणार नाही तर मूळ अभ्यासक्रम बदला. विषयांची डेप्थ ठेवा पण काही विषय प्रयोगशील करून मुलांचा, पालकांचा ताण कमी झाला तर सुसंकारीत शिक्षणाचा अभिमान पुढील पिढीत निर्माण होईल. माझी शाळा छान आहे पण इंडियातून बोर्ड कमी केले पण लिहिण्याच्या परीक्षे पेक्षा प्रोजेक्ट का ठेवले नाही निदान सोशल विषय तरी . आम्हालाही शिवाजी, झाशी ची राणी आवडतात पण सोशल बोअर होते. अशी पिढी बनणे घातक आहे. स्वातंत्र्याची जाणीव, बलिदाने, वैभव शाली इतिहास, वैविध्य पूर्ण भूगोल हि भारतीय परंपरा पुढे अविरत जाण्यासाठी शिक्षण, अभ्यास पद्धती, ह्यावर विचार व कृती करून काळाच्या गरजानुसार नवीन बदल गरजेचे आहे .

हुमायून ने काय केले हा इतिहास शाळेतच तासाला विद्यार्थांचा गट तयार करून प्रोजेक्ट सारखे लिहून घेतले तर, विषय गोडी वाढून सर्वांचा सहभाग असेल. गणित ला महत्व व्यावहारिक जगात आहे. शाळेत त्याचा सराव अधिक करून घेतला तर गणित बद्धल आत्मविश्वास दुणावेल. सगळे करणे शक्य आहे जर शासनाने शिक्षक शाळे करता ठेवले तर, मतदान, जनगणना, अकारण ठेवलेले उपक्रम अशा अनेक गोष्टीं करिता शिक्षक भरडला जातो. महिने महिने शाळेशी संपर्क नसतो. मुख्य म्हणजे शिक्षक व विद्यार्थी हे नाते ताणाशिवाय मुक्त होईल. कार्यानुभव सारखे विषय शाळेत असतात, त्यांना पूरक असे प्रशिक्षण ठेवले तर मुलांना त्यांच्या व्यवसायाकरिता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र राज्यात ह्या बाबी कमी आढळतात. केंद्र सरकार त्यांच्या शाळा अद्यावत करते तर मग मराठी शाळा मागे का? कारण राज्य शिक्षण मंडळ! घरचा अभ्यास कधी द्यायचा ह्याचे पण नियोजन करून वेळापत्रक दिले तर वह्यांचे ओझे कमी होऊ शकते. वर्षभर मुलांना ताण कमी पडू शकतो. असे बरेच पर्याय आहेत.राज्य, शिक्षण मंडळ यांच्या नियोजनावर अवलंबून आहे.

‘शिक्षणाचा आयचा घो’ ……………..सिनेमा, बघू या कसा विचार मांडतो ते

बखूर

बखूर …
उद्………… झाडाचे अश्रू…….धूपाचे झाड! ……..ओमानी कल्पवृक्ष
dhupache zadउद् जे आपण संध्याकाळी मन वृति प्रसन्न व्हावी म्हणून जाळतो. तोच ओमान मध्ये बखूर म्हणुन प्रसिद्ध आहे. ओमान, भारत, इथिओपिया इत्यादी देश ह्याचे मुळ देश म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात मी तरी अजून धुपाचे झाड पहिले नाही. इथे ओमान मध्ये दोफार, सलाला भागात सहज बघायला मिळतात. झाड डोंगराळ खडकाळ जमिनीत येते. त्याची उंची साधारण चिक्कू च्या झाडा एव्हढी असते. बुंध्यावर चिरा पाडून उद गोळा केला जातो. त्याला ओमान मध्ये झाडाचे अश्रू म्हणतात.

dhupache zad1 Frankincense-Tree-Salalahdhupache zad2भारतात पण उद हा सर्व धर्मा मध्ये वापरला जातो. झाडापासून अत्तर, तेल, औषधे( गुढगेदुखी, दमा, विषारीदंश,स्कीन चे आजार) बुद्धी वर्धक , सौंदर्य प्रसाधने, केसांचे वर्धननिगा, अशा डोक्यापासून पायापर्यंत सर्व बाबींकरिता झाड, त्याची फुले, पाने..उपयोगी पडतात. ओमान चा प्रमुख व्यवसायांपैकी हा एक आहे. झाडाचा पर्ण फांद्यांचा घेर छत्री प्रमाणे असतो. वर्षभर उत्पन मिळत राहते. इथला बखुर प्रती बाबत उच्च असून जगभर निर्यात होते.

dhup5 इथले ओमानी सरकार, प्राणपणाने हि झाडे जपतात. त्यावर खूप प्रेम करतात. ओमानच्या डोंगराळ भागात आढळणारा हा धूप शहरात पण प्रतीकांच्या रुपात ‘राउंड अबाउट’ (म्हणजे भारतात रस्त्या वरचे नाके) येथे उभे केले आहेत. ओमानी माणूस जेथे तिथे बखुर लावलेला असतोच. झाडा ला फारशी निगा लागत नाही. थोडासा काटेरी झाडा सारखा अविर्भाव असतो. बखुर झाडे पाहण्यासाठी मुद्दामहून प्रवासी जातात. ओमानी बाहेर जाताना बखुर चे भांडे कपड्या भोवती फिरउन मगच बाहेर पडतो. त्याच्या घरात कायम बखुर पेटता असतो. प्रवेश द्वाराजवळ ठेऊन सुगंधित स्वागत केले जाते.

Wadi Kabir

Round About

frankincense-store
अशी ही धुपाची झाडे मी घेऊन आले फोटोंच्या रुपात सर्वांसाठी………………………..

त्यांचा, आदेश…………….

कालच्या दिवसभरच्या धावपळीने थकवा वाटत होता. मनासारखे घडले नाही म्हणून नाराज होतो. रेल्वे च्या गर्दीतून बाहेर पडल्यावर, बंद पुकारलेला असल्याने रस्त्यावर जी शांतता जाणवते, तसे मनाचे झाले. प्रत्येक जण एकटा होऊन रस्ता चालत असतो, सर्वांचा लोभ मिळवणारा मी, आज तसाच एकटा पडलोय. शांततेचा भंग करणारी दारावरची थाप ऐकून बेल वाजवायचे पण कष्ट नको ह्यांना, कोण बर असेल विचार करीत दार उघडले.

दाराच्या उंबऱ्या वर चेहेरा पण दिसणार नाही अशा पद्धतीने, ‘त्या’ दोन्ही हातात बाळाला आडवे करावे तसे, एकावर एक पिशव्यांची चळत ठेऊन फक्त डोळ्यांनी मला पाहत होत्या. खुणेनेच मला सांगितले, पायाने दार वाजविले. मिलियन डॉलर चे नाही, पण मोनालिसा एवढे तरी हास्य चेहऱ्यावर आणत म्हणालो, ”या”

‘त्याही’ शांतपणे घरात आल्या. पिशव्यांची चळत खाली ठेवायला साहजिकच मदत केली. मध्यमवयीन गृहिणी असाव्या. ‘त्या’ पाणी पीत होत्या व मी विचार करीत होतो. कोण आहेत ह्या? हे काय आणले आहे. दोघां मध्ये शांतता होती, जी मला असह्य शांत करते. मी बैचन होऊन ‘त्या’ बोलणार कधी ह्याची वाट पाहत होतो.

”त्या”——– ‘नमस्कार’ आज मी मुदामहून आपणाला भेटण्यासाठी आले. सुखात सगळे येतात, दुखा:त जो येतो, तोच आपला म्हणायचा

(विचार आला माझे दुखः दिसते वाटत चेहेऱ्यावर) तरी भाबडेपणा चेहऱ्यावर आणला, छे! हो, असे काही नाही.

”त्या”——— असो! वाईट गोष्टी कशाला आठवा. हे सर्व तुम्हाला द्यायला आले.

(दुखा:त पण भेटी येतात, हे ‘दादुनी’ सांगितले नव्हते) कोणी पाठविले तुम्हाला?

”त्या”———– कोणी कशाला पाठवेल. तुमच्या मुळे मी हुशार झाले, म्हणून स्वतः निर्णय घेतला व आले.

(मी शिक्षकाचे काम कधीही केले नाही)

———————तुमची ओढ इतकी आहे कि मी ठरवलेच काही नाही आपण साथ द्यायची. त्या साठी ह्यांच्याशी पण भांडून इकडे आले.

(मी ओढ लावण्यासारखे कधीच बाहेर काही केले नाही. मला राणी मुखर्जी सारखी दिसणारी, माझी बायको मोठ्ठी असली तरी, आजही प्रिय आहे)————तुम्ही भांडून का आलात?

”त्या”—————-फारच कोरडे पणाने बोलता आपण. पूर्वी कसे मधाळ हसू चेहऱ्यावर असायचे, शब्दात गोडवा जाणवायचा. तरी मी ह्यांना म्हणाले कि, ”राजकारणात भल्या भल्यांचे माकड होते”.

मी समाजकार्याची आवड म्हणून राजकारणात आलो. घरा, घरातून फिरताना अडचणी जाणवत होत्या. माझी मदत करण्याची ईच्छा होती. जाऊ दे भूतकाळ आहे माझा.

(तरीही ‘त्या’ आपला हेका सोडत नव्हत्या)

”त्या”————– किती! दुखी: केलेत आम्हाला तुम्ही. सासरी आल्यावर पण मी एव्हढी रडले नव्हते. आता नवीन लोकां बरोबर जमून घेते पण नाईलाजानेच. माझ्या सारख्या दुखी: झालेल्या आपल्या माहीम मधल्या १०० जणी कडे मी गेले.

कशाला एवढा त्रास घेतलात. आधीच संसारातुनी वेळ काढुनी……….व्याप सांभाळणे कठीण असते. आभारी आहे. आता जरी घरी बसलो तरी ‘दादुना’ सांगेन जमेल तशी मदत करायला.

“त्या”———– तीन नि तीन अपेक्षा पण नव्ह्ती, साईबाबा न कडून डोके मिळवून आले. ‘ सर दे साई’ असे मागत होते म्हणे! म्हणून तेरा झाले.

एकाच घराच्या दोन भिंती, कशाला इकडचे, तिकडचे असा फरक करा. दरवाजा तर भक्कम आहे. शून्य तरी नाही, शंभर व्हायला वेळ कितीसा लागेल. ‘जय भवानी, जय शिवाजी’

”त्या”———— जाऊदे ते समाजकारण आणि राजकारण. मी आले कशाला ते सांगते व जाते कारण पुढच्या दीपावलीत ह्यांना खर्च नको, हेच ९८ जणींना समजावून भेट द्यायला आले.

कोण ९८? कळले नाही. उखाणे ऐकण्याची सवय होती मला एककेकाळी, पण हे सांगितल्या पेक्षा १० वस्तू वेगळ्या आणल्या सारखे झाले.

”त्या”————९८ माझ्या मैत्रिणी अधिक मी १ म्हणजे ९९ झाल्या. एकाचीच तर गंमत आहे.

(ह्या तर आकडे सांगायला लागल्या, ‘मातोश्रींना’ बोलावू का मदतीला) ——एक आकडा सविस्तर सांगता का?

”त्या”——— मी हावभाव करते. ओळखा.

त्यांनी बोटांनी १ आकडा दाखवला, व नंतर २ अक्षरी शब्द आहे असा दमशेरा खेळ खेळला. मला काहीही बोध झाला नाही. गोड बोलून कोडी घालणारा मी, सोन्याचे नाणे हरविल्या सारखा माझा चेहेरा झाला.———कळले नाही हो मला.

”त्या”———–९९ चा हिशोब कळला असेल. आता हा १ आकडा म्हणजे, “ ……………..योग तुझा घडावा” ह्या श्लोकाची सुरवात जिथून होते तो शब्द म्हणा.

ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे, सदा……………असेच न! पण ह्या पिशव्यातून आहे तरी काय?

”त्या”———-आमच्या ९९ जणींच्या व सदा ची सर्वदा असणारीने पण, आमच्या नवऱ्यानी तुम्हाला लक्षात ठेवले नाही. ह्याचा फार राग आला आहे म्हणून तुम्ही दिलेल्या ‘पैठण्या’ परत द्यायला आणल्या आहेत.

मी घेऊन काय करू?

”वाहिनी”———-आम्ही प्रेमाने देतोय. सदा च्या घरातून निरोप आहे, ”तुम्ही दिलेली पैठणी नेसून ह्यांना ओवाळणार होते पण आता शक्य नाही. राग मानू नका. पण ह्यांना कदर नाही हो! म्हणून मागच्या दारातून परत करते” आता या न तुम्ही पहिल्या सारखे, दारात छान रांगोळी घालते. पाच वर्ष तरी पुन्हा सवड आहे आहे तुम्हाला. तुमची पैठणी नेसून तुम्हालाच ओवाळायचे आहे आम्हाला, हे ही खूष पैठणीचा खर्च नको ………”भाऊजी”

मी नेहमी सारखा हसलो. वाहिनी नी मोबाईल केला, ”अहो!” पलीकडून आवाज ऎकू आला ”आला आला बांदेकर पैठणी घेऊन परत आला”

असा त्यांचा आदेश मी स्वीकारला

भेटवस्तू

दीपावली झाली म्हणून हुशः करून बसले. दीपावली करिता म्हणून काढलेले रांगोळीचे डबे, लायटिंग च्या माळा, पणत्या…..एक न दोन अशा सर्व गोष्टी पुढील वर्षापर्यंत नीट राहाव्या म्हणून कपाटात ठेवण्याकरिता कपाटाचे दार उघडले, अरे ! हे काय कपाट भरलेले.आपणच भरतो, आणि पुन्हा अगम्य असे रहस्य वाटून कपाटासमोर स्थितप्रज्ञ होतो. मी ही असच केले होते, आलीया भोगासी……असा दीर्घ श्वास घेत आता आवरायला पाहिजे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली, आणि कपाटात जागा निर्माण करण्यासाठी, घरभर माझी पळापळी सुरु झाली. घरातल्या शोकेस ने तोंड वेंगाडले, मुलांच्या कपाटाने अंग झटकले. पोटमाळ्याने पण मला झिडकारले. ह्यांचे कपाट तर माझ्या पर्स मधल्या सामानासारखे अस्ताव्यस्त असते. खिन्न झाले.काय करावे ? कसे आवरावे ? सुचेना काही.

माझ्या कपाटा समोर योध्या सारखी सामोरी गेले. एक भली मोठ्ठी पिशवी, रंगीबेरंगी दिसली म्हणून उघडून पहिली, तर दीपावलीच्या भेटवस्तू होत्या. त्यांचे आकर्षक वेष्टन सुद्धा दूर करू शकले नव्हते. मुकेपणाने.अडगळीत पडल्या सारख्या केविलवाण्या भासल्या. कधीही न लागणाऱ्या,गरज नसलेल्या,भारी किमतीच्या,बेताच्या दर्जाच्या टिकाऊ ,टाकाऊ भेटी होत्या आपल्या मालकांचा दर्जा दर्शविणाऱ्या, भावनांपेक्षा, औपचरिकता अधिक होती.माझे घर ‘ जगत मित्र ‘ प्रमाणे तुपातल्या पिठीसाखरे सारखे सण आले कि, पाहुणे, आप्त, स्नेही, कार्यालीन ओळखीचे ह्यांचात रमते. माणसांची ओढ त्यांच्या भेटवस्तू मुळे अशी अंगावर येते.काहीही आणू नका असे निक्षून सांगितले तरि,हातात ठेवले जाते.पुन्हा त्यांच्या कडे जाताना त्यांच्या भेटवस्तू च्या किमतीचा विचार करून रिटर्न गिफ्ट देणे भाग पडते. अभिमन्यू चे चक्र आठवते.

कपाटाचे खूप झाले कि काय मला फ्रीज आठवला, धावले तिकडे ह्यावेळी मिठाई व चौकलेट यांनी गर्दी केली होती, सुकामेवा महाग झाल्याने हा पर्याय ! फ्रीज च्या बाहेर ठेवणे शक्य नाही. कसे निस्तरायचे सगळे , विचारांचे चक्र गरागरा फिरत होते.

उचलून देऊ का कोणाला? कामवाली, सोसायटीचा राखणदार, दुधवाला, पोस्टमन सगळे दीपावलीचे पैसे मागतात, तुमच्या वस्तू घेऊन ठेऊ कुठे विचारतात. खरे आहे. ह्या भेटवस्तूंच्या व्यापात फराळाचे ताट आठवले, प्रत्येका कडून प्रेमाने ताट यायचे, कौतुक, जिव्हाळा जाणवायचा,कितीही खाल्ले तरि कंटाळा नाही यायचा, कॅलरीज चा विचार स्पर्श पण करत नव्हता.नात्यांना उब मिळायची. हं गेले ते दिवस ! हे तर दिवाळीचे, पण गणपती म्हणजे मोदकांचे ढीग, फळांची रास, नका हो ठेऊ तर भावनांचा प्रश्न ? एक मस्तक, दोन हस्त, चांगले मन पुरेसे नाही का सणांना ? घर सोडून बाहेर जाता ही येत नाही कारण घरी सण असतो मग हे वेळच्या वेळी संस्थाना पाठवणार तरी कसे ? शोकेस च्या वस्तूं चा आश्रमांना काय उपयोग ? घरचे एवढे सारे तर सार्वजनिक ठिकाणी ? कोण आवर घालणार ? भावनांच्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
लग्न समारंभात ‘ कृपया, आहेर आणू नका, पुष्प पण नको,आपली उपस्थिती हाच आमचा आनंद ‘ असे आमंत्रण मिळते. अशीच शुभेच्छा पत्रे आमंत्रणाची सणांना मिळतात का? आपणच तयार करावी हे बरे होईल.फटाके करिता जनजागृती होतीय, मग भेटवस्तू करिता काहीतरी असेलच……. की नाही. सुरवात आपण करावी,थोड्या फार फरकाने ह्या परिस्थितीत सगळे कधी ना कधीतरी असतोच. विचारांचे चक्र, मनात आंदोलन देते झाले.

भेटवस्तू सणाच्या देणे,घेणे चालू ठेवायचे तरी किती,
हे सारे थांबावे ,पैशांचा अपयव्य टाळण्यासाठी,
घरापासून सुरवात आपण करणार तरी कधी ?

भेटवस्तू ह्या प्रेमाच्या,जिव्हाळ्याच्या निदर्शक असतात. चांगल्या संकल्पनेचा अतिरेक होऊ नये. पुस्तके,कुटुंबाकरिता खरेदी कुपने, ग्रंथालयाची फी, प्रवासाचे प्रवासी चेक, आरोग्य तपासणी फी अशा अनेक माध्यमातून आपण भेटवस्तू देऊ शकतो. फक्त परिवर्तनाची तयारी दाखवली पाहिजे.