WAQBAH ओमान

वाळवंटी देश म्हंटला कि, डोळ्यासमोर येते विस्तीर्ण पसरलेली वाळु आणि रुक्ष वातावरण. ओमान देश ह्या बाबत खरच खूप सुदैवी आहे. ओमान ला जसे वाळवंट आहे तशीच निसर्गाची उत्तम साथ देखील आहे. इथल्या डोंगर रांगांमध्ये सौंदर्य आहे, दऱ्यांमध्ये वाहते पाणी आहे आहे ओमानी मेहनत करून ह्या उपलब्धतेचा फायदा घेत , निसर्गाची काळजी घेत उत्तम रित्या शेती करत आहेत ती सुद्धा संपुर्ण सेंद्रिय. वक़्बह हा ओमान मधील भाग अत्यंत हिरवागार, सुंदर आणि शेतीने समृद्ध असा आहे. इथे वाळु सोबत माती देखील आहे. थोडी माती आणि वाळु ह्यांच्यात सर्व प्रकारची फळे, पिके, भाज्या असे विविध सकस उत्पादने घेतली जातात. कुठेही रासायनिक पद्धत अवलंबली जात नाही.

Al Waqbah is characterised by tourist sites and many natural sites, such as high peaks, caves, natural valleys, farms and pure water sources. It is also famous for its “Aflaj” or ancient irrigation system or water channels and waterways that rely on rainwater.

Many agricultural crops are grown in this town during the summer and winter, where all types of date palm trees and vegetables, such as carrots, onions, garlic, squash, eggplant, tomatoes, radishes, lettuce, cabbage, cucumber, parsley, pepper, pumpkin, wheat and barley are grown, along with lemon, bananas, mangoes, oranges, olives, pomegranates and figs.

Recently, strawberry, cherry and hibiscus have also been planted as the favourable weather in the region aids the growth of these fruits.

One of the most important agricultural crops planted in the town is grapes of different varieties that are spread across farms and homes. Villagers are keen on growing grapes from the beginning of the season.” As soon as summer begins, farmers begin harvesting grapes, citrus and fruits, but, vineyards with their varieties have the greatest interest among farmers in the town.

There are several other varieties of grapes, such as Al Tai’fi, the white and the imported, which are successfully grown in the town. As the month of June begins, farmers start to prepare for the harvest. They gather at homes where they give to relatives, friends and neighbours. Farmers take care of the trees, trim them, and use organic fertilisers to get the best harvest of the delicious grapes.

अशी आहे  सुंदर वक़्बह ची ओळख…

वाळवंटी जीवनशैलीच्या संग्रहणीय कलाकृती…….

गडकोट किल्यांचा महाराष्ट्र माझा, कौलारू घरांचा, शेतात डोलणारा महाराष्ट्र माझा, मिळेल का पहावयास पुढच्या पिढीस असा महाराष्ट्र माझा, घराच्या शोकेस मध्ये ठेवण्यास शोधते महाराष्ट्र माझा…. इथे अशा प्रतिकृती पाहून आठवलं ते महाराष्ट्रच असीम सौंदर्य, भक्कम किल्ले, आदिवासी जीवन…..कोल्हापूरला ग्रामीं जीवन शैलीच संग्रहालय पाहण्यास आहे. आपण दीपावलीत किल्ले करतो आणि मोडून पण टाकतो. बाजारात जे तयार किल्ले मिळतात त्या प्रतिकृती तंतोतंत नसतात. अशा काही प्रतिकृती मराठी तरुणानी बनवल्या तर एक आगळावेगळा व्यवसाय निर्माण होवू शकतो. घरात आपल्यालाला कायम स्वरूपी असा छोटेखानी संग्रह ठेवण्यास मिळाला तर निश्चित अभिमान वाटेल. संकृती साहित्यांनी, प्रत्यक्ष पाहून पुढच्या पिढीस संक्रमित निश्चित करता येते. पण कदाचित चीन अशी मॉडेल्स आणून आपल्यालाच विकतील…. इतिहासाच्या गाढ अभ्यासकांनी मनावर घेतले तर तंतोतंत किल्ले बनवणे अशक्य नाही…मला सुचले, इथे पाहून आपल्या करता काही करता येईल का? कोणाला कल्पना सुचवली तर??? माझ्या कडून हा अल्पसा प्रयत्न…. ग्राम विकास साठी पण निश्चित विचार करता येईल.. अभिप्राय जरूर कळवा…….

घरात एक कोपरा विहिरीचा असावा.ओमान मध्ये बऱ्याच आधुनिक सुखसोईच्या अद्यावत बंगल्यांच्या बाहेरील अंगणात छोटेसे गाव साकारलेले असते. अशा विहिरी ह्या त्यांचा अभिमान आहे म्हणून त्यांना खास उभारलेले असते.

मध…मधुमक्षिका पालन ओमानचे.

अरब देशांमध्ये मधाचा वापर स्वयंपाक ते आरोग्य यासाठी अधिक केला जातो. ओमान चा मध हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने बनवलेला असतो. निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा वापर प्रामुख्याने असतो. मधुमक्षिका पालन येथे वेगळ्या पद्धतीने केले जाते. येथे प्रामुख्याने खजुराची झाडे प्रंचंड प्रमाणत लावली जातात. खजुराच्या झाडाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा बुंध्याचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. बुंधा आतून पोकळ केला जातो. त्यात मधुमक्षिका पालन करतात. नारळ , पपया, पाम, आणि अनेक सुवासिक झाडांचे बुंधे वापरून मधाचे उत्पन्न घेतात. वेगवेगळ्या झाडानुसार सुवासाचा आणि चवीचा मध येथे उपलब्ध आहे. मध प्रक्रियेत मधाला त्या विशिष्ट झाडाचा सुवास लाभतो. असा फ्लेवर्ड मध इथे खूप लोकप्रिय आहे.

Apis millifera and Apis florea. ह्या दोन जातीच्या मक्षिका येथे पालनासाठी उत्तम मानल्या जातात. परदेशी जातीच्या माशा पाळणे इथे कायद्याने बंदी आहे. ह्या जातीच्या माशा इथल्या जातीय आहेत. माऊंटन बी म्हणून ह्या इथल्या हवामानास पोषक मानल्या जातात. ह्या जातीच्या माशा आकाराने छोट्या परंतु खूप कामसू असतात आणि उच्च प्रतीचा मध गोळा करून आणतात. रुस्ताक आणि सलाला ह्या भागात अनेक फळ झाडे आणि फुल झाडे , शेती हि विस्तृत प्रमाणात आहे. ह्या ठिकाणी अशा मधुमक्षिका कॉलोनी खूप आढळतात. तसेच अति डोंगराळ भागात रानटी झुडुपे फुलांची दिसतात. अशा अति उन्हाळी भागात ह्याच माशा अनुकूल आहेत. ह्या जातीच्या मधू मक्षिका राष्ट्रीय संरक्षण प्राप्त आहेत. ओमानला ह्या जातीच्या माक्षिकांचा अभिमान आहे. संपूर्ण आखाती देश ओमान मध्ये येवून मध घेऊन जातात.

खजुराचा बुंधा पोकळ केला जातो त्यास ‘tubl’ असे संबोधतात. अशा टूबल एकमेकावर रचून मक्षिका पालनाच्या विस्तृत अशा मधू मक्षिका कॉलनी येथे आहेत. मध काढून घेण्यासाठी हा बुंधा मागच्या बाजूने उघडत्तात. मधुमक्षिका पालनासाठी सरकार कडून खास मदत दिली जाते. मक्षिका करता येथे डॉक्टर पण आहेत. स्वतःचा व्यवसाय असला तरी हा खूप सन्मानीय येथे मानला जातो. सरकारकडून मटेरिअल, सर्विस उत्पादनाकरीता दिली जाते.

मध पालनाची परंपरा कुराण काळा पासून प्रचलित आहे. पूर्वीच्या इथल्या राजमहालात मध असलेली खजुराची झाडे ठेवण्यासाठी खास खोल्या होत्या. ह्या खोल्या मधून एकेका खळगीत एकेक झाड ठेवून, ते नंतर प्रेस करत त्यातील मध पन्हाळी मार्फत गोळा केला जात असे. अशा खोल्या आजही किल्ले, महाल यांना भेट दिली कि उत्तम स्थितीत बघण्यास मिळतात.

ओमान मध्ये एकंदरीत ३५००० मधुमक्षिका कॉलनी आहेत. जून ते नोव्हेंबर काळात उत्पन्न घेतले जाते. २००८ मध्ये ९६,०२६ किलो मधाचे उत्तपन शेती खात्यात जमा झाले. संपूर्ण आखाती देशात ओमान चा मध निर्यात केला जातो. उच्च प्रतीचा मध तेही सुवासाचा हे मधाचे वैशिट्य…

मधू मक्षिका पालनाची अशी पद्धत वेगळी असल्याने लिहिली.

शेतकऱ्यांचा मित्र……. जी.पी.एस.

आधुनिक तंत्रज्ञान हे नेहमीच उपयोगी असते. ओमान चा शेतकरी तंत्राद्यानाची मदत घेऊन आपले शेतीचे उत्पन्न नुकसानीत होऊन देत नाही. इथे सरकार दरबारी शेतकरी खूप सन्मानित केला जातो आणि सरकारकडून सर्व मदत दिली जाते. खजुराच्या लाखोंच्या संख्येत असणाऱ्या झाडांवर, शेतीवर दुबास किडीचा प्रादुभाव खूप वाढला आहे. खेडोपाड्यातील शेती ची किडी करता मोजदाद करण्यासाठी शेती विभागाकडून शेतकऱ्यांना जी. पी. एस. सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अति अंतर्गत भागात किंवा दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहचे पर्यंत शेतकऱ्याचे अपरिमित नुकसान होते. तसेच कागदोपत्री अशी मोजदाद ठेवणे पण अवघड होऊन बसते. अशा अडचणी येथे पण आहेत. ओमान च्या शेतीचा मुख्य आधार म्हणजे खजुराची झाडे होत. येथील सरकारने त्वरित शेतकऱ्यापर्यंत किंवा किडीचा पादुर्भाव असलेल्या भागापर्यंत योग्य ती उपाय योजना जलद मिळण्यासाठी हि आधुनिक सेवा शेतकऱ्यांना दिली आहे.

लाखोंच्या संख्येत झाडे आहेत आणि किडीचा प्रभाव, वाढ पण तितक्याच संख्येत आहे. हि कीड येथे ‘दुबास’ नावाने संबोधिली जाते. प्रत्येक भागात अगदी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खजुराच्या झाडांची पण मोजणी काटेकर पणे केली जाते. हि कीड झाडातील रस शोषून घेते आणि झाड शेवटी मृत्युमुखी पडते. संपूर्ण देशात युद्धपातळीवर योजना अमलात आणली जात आहे. येथील शेतकरी हे राष्ट्र करता सन्मानीय आहेत.

पिवळसर असलेल्या ह्या किडीची मोजदाद नजरेस पडली आणि येथील वृत्तपत्रातून त्वरित शेतीवर आलेले अस्मानी संकट आणि उपाय योजना सविस्तर सर्वाना जाणवून दिली. अनेक संस्था येथे सरकारच्या बरोबरीने मदत करत आहेत.

प्रत्येक वेळी कीटकनाशके फवारणी हि मार्गदर्शनाने केली जाते तसेच अजूनही काही उपाय आहेत का ह्याची चाचपणी केली जाते. कीटके एकत्र गोळा करण्यासाठी बादली सदृश असा एक वेगळ्या प्रकारचा फासा झाडाच्या बुंधापाशी ठेवण्यात येत आहे. कीटके आतच पकडली जातात आणि आतील विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आकर्षित होऊन बादलीच्या आतच मरतात.

सरकारने दिलेल्या जी पी एस वर त्या त्या भागाच्या शेतकऱ्यांनी किडीचा पादुर्भाव किती प्रमाणात आहे ह्याची नोंदणी करायची असते त्या साठी हे तंत्रज्ञान त्यांना शिकवण्यात आले आहे. एकत्र येवून आपल्या भागाची चोख पाहणी करणे आणि डेटा एन्ट्री करणे. लगेच तिथपर्यंत
सरकारी अधिकारी आणि शेती तज्ञ पोहचतात. किडीचा पादुर्भाव प्रखर असलेल्या भागाची नोंद मिळत राहते आणि देशभर पसरलेल्या लाखो शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविले जाते.

अनेक संस्था शेतीच्या कामाकरता पुढे येवून, काही शेतकरी जर दत्तक घेऊन त्यांना आपली अशी खाजगी सेवा देवून काही प्रमाणात तरी शेतीच्या समस्या कमी करण्यास मदत होईलच आणि शेतकऱ्यांना फार मोठा आधार मिळेल.

कदाचित आपल्या ग्रामीण विकासाकरता आपले हे योगदान म्हणजे राष्ट्राचा विकास ठरेल.

मला हि योजना पटली फक्त गरज आहे अशा प्रकारच्या संस्थांची आणि आपल्या शहरी नागरिकांची शेतकरी आणि शेती करता असलेल्या जबावाबदरीच्या जाणीवेची…..कोणी तरी, कुठली तरी संस्था ह्या लेखातून प्रेरणा घेऊन अशी सुरवात करेल हीच अपेक्षा आणि एक चांगली योजना आपण माहिती करून घेण्यासाठी….

ओमान चे प्रसिद्ध गुलाबपाणी …….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणून बारा महिने सदा हरित अशी डोंगर रांग आहे. येथेच डिसेंबर महिन्यात बर्फ वृष्टी होते. गुलाबी रंगांची विलक्षण मधुर सुवासाची ओमानी गुलाब शेती येथे प्रसिद्ध आहे. साधारणपणे किंबहुना त्यापेक्षा अधिकच पण ७००० ते ९००० एवढी गुलाबाची झाडे आहेत, ते सुद्धा तेव्हढ्याच समुद्र सपाटी उंचीवर…..मार्च मध्यापासून ते मे अखेरी पर्यंत पूर्ण परिसर हा गुलाबी आसमंताचा होतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क काढणे म्हणजे गुलाब पाणी हि प्रक्रिया असली तरी ती येथे सहज पाहण्यास मिळाली म्हणून जरा वेगळी वाटली. असे गुलाब पाणी म्हणजे ऊर्ध्व पतन प्रक्रिया करून मिळवलेला गुलाबाचा अर्क असतो पण इथल्या पारंपारिक पद्धतीत बघण्यास अनेक पर्यटक मुद्दामहून येतात.

गुलाबाच्या झाडापासून ह्या मोसमात १५ ते २० किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून ७५० मिलीलीटर अर्क मिळतो. गुलाबाची फुले भल्या पहाटे तोडली जातात आणि ती स्वच्छ असा पांढरा रंग वस्त्राचा घेऊन त्यात फुले ठेवली जातात. अल दुहाजान म्हणून मातीची बनवलेली चूल असते, त्यावर अल बुरमः म्हणून मातीची सुरई सदृश भांडे असते त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रचल्या जातात. ह्या पाकळ्यांवर तांब्याचे खास बनवलेले भांडे ठेवून, चुलीवर मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये थंडगार पाणी भरले जाते पाणी भरलेले मातीचे भांडे मातीने सील ( मातीचे लिंपण करून हवाबंद करणे ) केले जाते. जवळ जवळ चार तास मंद चुलीवर फुले ऊर्ध्व पतन केली जातात. नंतर अल करास म्हणून मातीच्या मोठ्या उभट भांड्यात तीस दिवस झाकून ठेवतात. मग ते पाणी गुलाब पाणी म्हणून तयार होते.

जशी मातीची चूल गरम होऊ लागते तसे अल बुरमः गरम होण्यास सुरवात होऊन आतील तांब्याचे भांडे गरम होते आणि तांब्याच्या भांड्यात पाकळ्यांचा अर्क गोळा होऊ लागतो. एका गुलाबाच्या झाडापासून मोसमात पंधरा ते वीस किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून सातशे मि. ली. अर्क मिळतो. जवळ जवळ सर्व अरबी पदार्थात गुलाब जल हे प्रामुख्याने असतेच.

इथे गुलाब जल बनवण्याची प्रक्रिया जबल अक्थर येथे सहज बघण्यास मिळते. ह्या व्हीडीओ मध्ये गुलाब पाण्याची प्रक्रिया दाखवली आहे……..

माळ्यावरची ट्रंक…….एक पूर्ण विद्यापीठ.

माळ्यावरती एक ट्रंक कायम असते. तिचा रंग उडून गेलेला असतो तरी पण तिच्यावर प्रेम कायम असतेच. घरातील बच्चे मंडळीची उत्सुकता कायम ह्याच ट्रंक भोवती रुंजी घालत असते. असत काय ह्या ट्रंकेच्या पोटात??? म्हणण्यास निरर्थक पण कधीतरी उपयोगी पडेल म्हणून साठवलेले बरेच काही. अशी ट्रंक आजीच्या/आईच्या काळात मुली लग्न करून सासरी जाताना घरी घेवून जात असत. मग तर काय त्या ट्रंकेला बहुत सन्मान असणे स्वाभाविक आहे.

पूर्वी घराची छोटी छोटी दुरुस्ती घरीच करत असत. जेंव्हा गरज पडत असेल तेंव्हा खास रविवारी अशी ट्रंक माळ्यावरून वडील आमच्या कडून काढून घेत. मग काय त्या ट्रंक भोवती आम्ही भावंडे डोकावून पाहत राहायचो. आई, स्वयंपाक घरातून म्हणायची माहेरून आणली आहे हि ट्रंक…एकदा रंग द्या तिला. ह्या ह्या अपेक्षित वाक्यामुळे वडील मिस्कील हसत.

ह्या जादुई पेटीतून असंख्य खिळे, निरनिराळे नटस्, पाने, जुन्या जुन्या वायरींची भेंडोळी, वापरात असलेले पण नवीन पद्धतीचे बसविले म्हणून पेटीत गेलेले पंख्याचे बोर्ड, जुनट अशा प्लास्टिक च्या पिशव्यातून भरलेले, बरेचसे गंजलेले असे स्क्रू… सुतळी, नायलॉन दोरखंड, निरनिराळे कटर्स, बोल्ट्स, पीव्हीसी पाईप चे लहान मोठे तुकडे, लाकडाचे चोकोनी,गोल तुकडे, करवत असे खूप काही.. आमच्या कॅरम ला चारही कोपऱ्यात हेच गोल तुकडे बसवून वडिलांनी दिले.

ह्या सर्व हत्यारांची रीतसर माहिती आणि यातील कुठली गोष्ट आता लागणार आहे हे वडील समजावून सांगत. मग ती ट्रंक पुन्हा नीट लावण्याची आणि माळ्यावर चढून ठेवण्याची जवाबदारी पूर्ण होई पर्यंत आई चा रविवारी आंघोळी करून घ्या हा तगदा, आपसूकच पुढे ढकलला जायचा. हत्यारांची पेटी असे गोंडस नामकरण ह्या पेटीला कधीच नव्हते तर ह्या ट्रंकेत असे खास कप्पे हि नसत. पुरचुंड्या करून, वायरी गुंडाळून कसेबसे ह्या ट्रंकेचे झाकण बसत. झाकण मात्र आतून त्याला काही पॉकेट दिल्यामुळे त्या त नेहमी प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळी करून ड्रिलिंगमशीन चे ड्रिल बीट ठेवलेले असत. ट्रंकेच्या खाली तळाला वर्तमान पत्र दर वेळी बदलून ठेवत असू. पत्र्यावर रुबाबदार पट्ट्या त्यावर लावलेले सदाफुलीच्या फुलाचे सोल्डर अजूनही भक्कम आहेत.

ट्रंक उघडली कि एक प्रकारचा हत्यारांचा, गंजलेला वास येई. तिच्या कड्या पण कशा भक्कम वाटायच्या. ह्या ट्रंकेच्या आकारात पण एक गुबगुबीत असा भास होत असे. दोन आण्याची ट्रंक अगदी नातवंडा च्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित आहे. अजूनही तिला रंग देवून कोणी फारसे कौतुक केले नाही.

ट्रंक म्हणजे एक पूर्ण विद्यापीठ आहे. कचऱ्याला सन्मान देउन त्यातील पुन्हा वापरात येणाऱ्या गोष्टी पासून नवीन काही तरी बनवता येते. हे छोटे विद्यापीठ पूर्वीच्या काळी माळ्यावर असायचे. आता मात्र काळाच्या ओघात हि ट्रंक नाहीशी होईल अशी सुप्त भीती वाटू लागली आहे. ट्रंक जपणे, त्यातील वस्तू गरजेच्या काळी आवर्जून बाहेर काढल्या जात असत. बच्चे मंडळीना हि ट्रंक म्हणजे भावी आयुष्याचे विद्यापीठ होते. ट्रंक सांभाळण्यात जिव्हाळा असायचा, आठवणी दडलेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे वस्तू निकामी असतील तर लगेच बाहेर टाकायच्या आणि उपयोगी पडणार असल्या तर योग्य वेळी त्यांचा वापर करणे हि शिकवण होती. सध्या काय हा कचरा?? पुन्हा कोण असल्या जुन्या गोष्टी वापरणार, घराला माळा पण नाही. हत्यारे असतील तर मुलांपासून दूर ठेवलेली बरी, पण त्यांच्या विश्वातील आवडीच्या वस्तू, पण आपल्या दृष्टीने कचरा वाटत असल्या तरी फटकन फेकून देवूया असे बोलणे म्हणजे प्रयोगशील वृतीला आपणच खीळ घालणे होय.

आमच्या काळी अशी विद्यापीठे नव्हती घर आणि घरातील सामन हे घरच्या सदस्य प्रमाणे जपले जात असत. हल्लीच्या विसाव्या शतकातील मुलांना असे प्रयोग शिकवणारे विविध माध्यमे सहज उपलब्ध आहेत. आपणही त्यात सहभागी झालो तर विरंगुळा आणि समाधान दोन्ही सहज मिळेल. आम्हाला आमची ट्रंक हेच विद्यापीठ होते. आयुष्य हे आव्हानात्मक आहे असे न मानता ते एक प्रयोगशील आहे हे सकारात्मक करून घेण्यासाठी महिन्यातून माळ्यावरून काढलेली ट्रंक अजूनही आधार देत आमचीच वाटते. बल्ब बदलणे, खिळा घरीच ड्रिल करून बसवणे, आईचा लाकडी पोळपाट, विळी घरीच दुरुस्त करणे, वडिलांना स्वीच बदलण्यास मदत करणे ह्यासाठी प्रयोग शाळा म्हणजे घर होते आणि साधने म्हणून ट्रंक होती. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तर असायचे पण ह्या गोष्टी करता बाहेरच्या मदती वाचून अडले नाही.

प्रत्येक मुलाची स्वताच्या आवडीच्या काही वस्तू असतात. रंगीत दोरे, गोट्या, मणी, प्लास्टीक चे आकर्षक आकार….इत्यादी अनेक अनेक. ह्या गोष्टीना पण त्यांच्या जवळ त्या वस्तूंची अशी खास ठिकाणे मुले तयार करतात. खेळता खेळता प्रयोगशील वृत्ती तयार होते आणि एखादा भावी काळातील संशोधक पण कदाचित जगाला मिळतो.

परदेशात गॅरेज अशी खास संकल्पना आहे जिथे फक्त कार करता सामान नसून ते घरातील अडगळीच्या पण लागणाऱ्या वस्तूंचे ठिकाण असते. ह्या ठिकाणी मुले खूप रमतात. आपण निदान त्यांच्या टेबल पाशी तरी अशी खास जागा करून दिली तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल.

माळ्यावरची ट्रंक ते जरा व्यापक स्वरूप म्हणून बोहरी आळी पर्यंत शास्त्र दडले आहे. मोडतोडीच्या सामनामधून एखादा अविष्कार पाहायला मिळू शकतो. ट्रंक आणि तिची माळ्यावरची जागा हा अविभाज्य घटक आठवणीचा आहे. आज विद्यापीठ म्हणून पुढच्या पिढी कडे ट्रंक सोपविली आहे.

एक जिव्हाळा, अतूट बंध आणि….माळ्यावरची ट्रंक

ओमान मधील आंतरराष्ट्रीय आतिषबाजी…….


चाळीसाव्या राष्ट्रीय दिनानिमित्त सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत वीस मिनिटे आंतर राष्ट्रीय फायर वर्क्स ठेवण्यात आली होती. अमेरिका, इटली, युके, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, होंगकॉग अशा सहा देशांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाला आपली तारीख दिली होती. रात्री आठ वाजता हि आतिषबाजीची कोट्यवधी रुपयांची स्पर्धा वीस मिनिटे ठेवण्यात आलेली होती. इथे हा एक मोठा सोहळा होता. रोझ गार्डन च्या मागच्या बाजूस डोळ्यांचे पारणे फिडणारी हि नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी देव लोकांतून ३३ कोटी देव पण डोकावून पाहत असावे इतकी सुंदर!!! आणि विलक्षण अनुभव देणारी अशीच होती.


एका क्षणात आपणाला रिमझिम अशा पावसाचा अनुभव तर दुसऱ्या मिनिटाला कोसळणाऱ्या धारा दिसाव्यात असे आकाश, कधी प्रेमाचा अविर्भाव तर कधी जंगलाचा भास अशा विविध कल्पना साकारत डोळे फक्त आकाशाकडे विस्मयतेने पाहत, बोलण्याचे पण सुचत नाही.

लाखो जनसमुदायाच्या साक्षीने रिमोट वर फटाके नव्हे तर स्वर्गीय कल्पना प्रत्यक्षात जमिनीवरून आकाशाकडे झेप कधी घेत होत्या हे कळत पण नव्हते. प्रत्येक देशाकरता लोकांना वोटिंग करण्यास सांगितले होते. ह्या स्पर्धेत फ्रेंच देशाने प्रथम क्रमांक मिळवला.

ह्या स्पर्धे करता वातावरणाचे प्रदूषण किती होते ह्या वर पण मीटर बसवले होते. कमीत कमी प्रदूषण करणारे पण विलक्षण नयन सुख आणि विविध थीम सुयोग्य पद्धतीने आकाशात मांडणारे म्हणून फ्रेंच अग्रसेर ठरले. स्पर्धा खूपच अटीतटीची होती, प्रत्येक देशाने त्यांच्या कंपनीने सर्व कौशल्य पणास लावले होते. यु ट्यूब वर व्हीडीओ आहेत त्याची हि लिंक

अहाहा!!!! अप्रतिम!!!!! विलक्षण सुंदर…….असे काही अनुभव फोटोच्या रुपात ह्या पोस्ट साठी.

न बोलणारे, मस्त जेवणाचे…….मस्कतचे रेस्टॉरंट ‘राजधानी’.

हॉटेल राजधानी, भारतभर आणि परदेशात हि त्यांच्या शाखा आहेत. पूर्णतः शाकाहारी गुजराथी आणि राजस्थानी थाळी हे जेवणाचे वैशिष्ट्य. अत्यंत अदबशीर, हसतमुख कर्मचारी वर्ग आणि सुबक पद्धतीने जेवणाचे पदार्थ अर्धगोलाकार थाळीत वाढले जातात. थाळीत एकंदरीत बत्तीस प्रकारचे विविध पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात.

अनेक मानांकने, पुरस्कार राजधानीला प्राप्त आहेत. भारत आणि परदेशात जेव्हढ्या शाखा आहेत तिथले मेनू हे एकाच पद्धतीचे आणि सतत बदलत राहणारे असले तरी पदार्थ सगळीकडे सारखेच असतात. आतापर्यंत २२,४६४ पदार्थ, बहात्तर मेनूमधून जगभर राजधानीत देण्यात आले आहेत.

मस्कत मध्ये साधारण पणे दीड वर्षापूर्वी राजधानीने आपली शाखा उघडली. अडीचशे ते तीनशे थाळी रोजची आणि गुरवार, शुक्रवारी तर चारशे च्या वरती ह्या थाळीचा आस्वाद मस्कतीय घेतात. पूर्ण थाळी किंवा छोटासा मिल बॉक्स सुद्धा घरी, ऑफिस मध्ये पाठविला जातो. अशा छान रेस्टॉरंट मुळे इथेही परदेशी पर्यटक भारताची शाही जेवणाची लज्जत घेण्यासाठी गर्दी करतात. अनेक नामवंत व्यक्तीनी इथे आवर्जून भेट दिली आहे. सणावारी किंवा सप्ताहाच्या सुट्टीला वेटर चा दंगा, आवाज, गलका नसलेले हे रेस्टॉरंट जणू काही ‘वदनी कवळ घेता……,ची प्रचीती देते.


आपले आगमन झाल्यावर हसत मुख कर्मचारी वर्ग अदबीने समोर येतो. प्रवेश दारापाशी ठेवलेल्या फुलांची आरास स्वागत पण सुगंधी करते. जेवण करण्याआधी, हात धुण्यासाठी पण राजेशाही थाट आहे. चकचकीत अशा पितळी सुरईतून उबदार पाण्याची धार आपल्या हातावर सोडण्यात येते. हात धूत असताना पाणी तबक सदृश भांड्यात आपल्या अंगावर न उडता गोळा होते. हात पण कसा राजधानीच्या डामडौलात धुतला जातो. पाण्याला पण सुगंधित केलेले असते.

जेवणात थेपला, छोटीशी भाकरी, फुलका, रोटला, पुरी आणि त्यावर अलगद विरघळणारे लोणी, अनेक प्रकारची फरसाण, विविध भाज्या, कोशिंबीरी, डाळ, कढी, खिचडी, साधा भात, दहीवडे,पॅटीस आणि मधुर चवीचे थंडगार ताक असा परिपूर्ण जेवणाचा छानसा मेनू खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहतो. एव्हढे पदार्थ वाढताना आणि आपल्या थाळीतलं जे काही संपत ते नेमके एका मिनिटात आपल्या समोर पुन्हा वाढण्यासाठी अदबीने हजर केल जात. आपण तर काहीही सांगितले नाही आणि कोणाचा आवाज हि ऐकला नाही मग असे कसे काय एकदम आले. असा विचार करताना आजूबाजूला पहिले तर रेस्टॉरंट मध्ये आवाजच नव्हता. जो तो आपल्यात किंवा आपल्या कुटुंबात, मित्र मैत्रिणीत रमला होता, तेव्हढाच आवाज होता.

जागोजागी वेटर उभे असूनही तत्परतेने नेमके पदार्थ जात येत होते. टेबलाच्या भोवती वेटर ना कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोटाच्या, हाताच्या खाणाखुणा करत सर्व ठिकाणी फिरत होती. ह्या खुणा म्हणजेच न बोलणारे, आपल्याला चटकन पदार्थ आणून देणारी राजधानीची खासियत आहे. हि प्रमुख व्यक्ती इथली कप्तान असते. ह्या व्यक्तीने टेबल पासून विशिष्ट अंतर ठेवून, जेवण करत असणाऱ्या व्यक्तीची समाधी भंग न करता वाढपी लोकांना अचूक संपलेले पदार्थ सांगणे हे अथीति देवो भव……….असेच वाटते. पदार्थ वाढताना वाढपी हातात प्लास्टिक चे ग्लोज घालतात. पदार्थ अत्यंत स्वछतेत बनविले जातात


उजव्या हाताचे पहिले बोट तिरके ठेवून चक्राकार पद्धतीने फिरवले कि चटणी. अंगठा दुमडून चार बोटे सरळ धरली कि भाजी, अंगठा दुमडून तर्जनी आणि मधले बोट दाखवले कि खिचडी किंवा पुलाव, पहिले बोट सरळ धरून मागे पुढे फिरवले कि साधा भात. चारी बोटे दुमडून अंगठा खाली झुकवला कि फिल्टर थंड पाणी, अंगठा मागे वळवला कि सामान्य तापमानाचे पाणी, अंगठा तिरका धरला कि मिनरल पाणी, तर्जनी आणि अंगठा जुळवून तीन बोटे सरळ ठेवली कि बिल, अंगठा झुकवून पहिल्या बोटाने वाकुली दाखवणे म्हणजे गोडाचे वाढप आणा, पाचही बोटांचा वर्तुळाकार आकार म्हणजे दही वाटी, पहिल्या बोटाचे फक्त पहिले पेर दाखवणे म्हणजे ग्राहकाला इथल्या टेबलवर तूप अजून वाढणे, अशा अनेक खाणाखुणा अत्यंत शिस्तीने रेस्टॉरंट चा कप्तान वाढप्यांना करत असतो.

स्वागत ते निरोप अशा बोटांच्या भाषेत बघताना काहीसे वेगळे पण जपले आहे हे जाणवते. तब्बल चाळीस च्या वर त्यांची कोड लँग्वेज आहे. अशा रेस्टॉरंट मध्ये नोकरी करायची झाल्यास हा अभ्यास करणे आवश्यक आहे. वाढपी लोकांचे कप्तान खाणाखुणांची उजळणी कायम घेत असतात.

हा खाणा खुणांचा तक्ता अभ्यासून त्या प्रमाणे जेवणासाठी आलेल्या ग्राहका पर्यंत तत्परतेने तो पदार्थ मिनिटात आणून देणे हे खरच कौशल्याचे काम आहे. जेवताना एखादी व्यक्ती कुठला पदार्थ तन्मयतेने समाधानाने पटकन संपवते हे लक्षात घेवून त्याप्रमाणे जर तोच पदार्थ अजून घ्यावा हा विचार मनात येतोच तोच पदार्थ हजर. मन कवडे खवय्ये यांना तर पर्वणीच असते.

इतके खुश झाल्यावर जर उत्तम सेवा ह्या साठी जर टीप देण्याची झाल्यास ती तिथल्या पेटीत जमा केली जाते. अदबशीर आणि हसत मुख स्टाफ लक्षात राहतो. इथला कर्मचारी वर्ग हा विविध भाषांमध्ये पारंगत आहे. मस्कत ची भाषा अरेबिक, फ्रेंच, सारख्या परदेशी भाषांबरोबर मराठी, मल्याळी, कन्नड, पंजाबी अशा भाषा इथले कप्तान सहज बोलतात. जेवणाची लज्जत हि भाषा माध्यमे अधिक वाढवतात. राजधानीचे हे अप्रूप अनुभवत लज्जतदार राजस्थानी, गुजराथी जेवण घेण्यास गर्दी वाढतच आहे.

मस्कत मध्ये MBD, OPP. KHIMAJI RAMDAS, BAIT AL AHLAM, RUWI.
TELE…..24811888. असा पत्ता राजधानी रेस्टॉरंट चा आहे.

राजधानी…. एक खानदानी परंपरा. मस्कत मध्ये भारताची परंपरा दिमाखाने जपत आहे.

खास आभार…..मस्कत च्या राजधानीचा कर्मचारी वर्ग. धन्यवाद.

किल्ल्यांची दीपावली …… सकाळ समूहाची स्पर्धा किल्ल्यांची

सहा वर्षांनी भारतात दीपावलीला असण्याचा योग जुळून आला. अजिंक्यने लहानपणी पाहिलेली दिवाळी विसरून गेला होता. पुण्यात राहणे म्हणजे किल्ले स्पर्धा पाहणे हे निश्चित केले होते. सोसायटीच्या अंगणात एक कोपरा कायम किल्ल्या करता राखून ठेवलेला असायचा. प्रथम किल्ला कुठला करायचा हे ठरवले जायचे. आमचं काळी काही नेट नव्हते ना झेरॉक्स चे मशीन होते. किल्ल्याचे चित्र इतिहासाच्या पुस्तकातून शोधून काढायचो. मग त्या नुसार दगडांची निवड, दगड दुसऱ्या ठिकाणाहून चोरून आणायचे, मग माती गोळा करून किल्ल्यावरची चित्रे गोळा करायचो.

ज्याच्या कडे शिवाजी असायचा त्याला काही काम नाही बाकीचे सर्व मावळे हा समजूतदार पणा मनात चिडचिड करत जपून ठेवायचे. मातीवर पेरण्यासाठी अळीव दुकानातून आणले जायचे. हात, पाय कसे मातीमुद्द होत असत. घरातील मोठ्यांकडून किल्ल्याचे परीक्षण केले जायचे. विहीर आणि शेत हा अविभाज्ज घटक त्या मध्ये असत. हि विहीर कोणी कशी केली आहे हे पाहण्यासाठी रात्री दुसऱ्या वाडीत किंवा सोसायटीत हळूच चोरून जात असू आणि आपली कशी अधिक चांगली करता येईल यावर फार मोठी खलबते होत.

विहिरी करता एक प्लास्टिक डबा प्रत्येकजण घरातून आणायचा त्यातील सर्वानुमते निवडून मातीत खड्डा करून डबा त्यात ठेवून पाणी भरले जायचे. सुई दोऱ्याच्या रिकाम्या रिळाचा उपयोग रहाट करण्यासाठी केला जात असे. प्रत्येक गोष्ट घरातून आणली जायची आणि त्याचा कल्पकतेने विचार करून किल्ला सजवला जायचा. हुबेहूब परिसर करण्यात जो तो मेहनत करत असे. तेंव्हा किल्ल्यांची कुठलीही स्पर्धा वैगरे नसायची. आम्ही सर्व जण एकमेकांचे किल्ले बघायला जात असू आणि मोकळेपणाने दुसऱ्या किल्ल्याचे कौतुक पण केले जायचे.किल्ल्यावरची भुयारे, चोर दरवाजे, शत्रू करता केलेले खंदक, किल्ल्यावर जंगलात असणारे प्राणी… यात वाघ, सिंह यांना वरचढ मान असे. हळूच डोकावणारे ससे… किती किती रचना ह्या शिवाजीमय बनवायच्या. चार फुटात महाराजांचा किल्ला बनवण्यासाठी सोसायटीतले चाळीस जण मावळे पण दमत असू. संध्याकाळ झाली कि उद्याच्या कामाचे वाटप ठरवत असू. झोप कधी लागायची पत्ताच लागायचा नाही.

किल्ला नंतर फटाके त्या मध्ये ठेवून उडविला जात असे मला हि कल्पना फार दुखःदायक असायची.पण सोसायटीतील टारगट मुले काही केल्या ऐकायची नाहीत. मग आई मला घरात ओढून नेत असे. तो दिवस किल्ला का मोडला??? म्हणून रडण्यात घालवला जायचा. पुढच्या वर्षी आपण आपल्या घराच्या ग्यालरीत किल्ला करू मग तू तो कायम ठेव असे वचन मला बाबा द्यायचे पण त्यात मज्जा ती काय?? सोबतच्या सर्वांसहित किल्ला करणे हेच तर खरे अप्रूप आणि सोहळा असायचा.

किल्ले म्हणजे दीपावली हे दृढ समीकरण होते. किल्ल्यांचा आणि दीपावलीचा काय सहसंबध असा प्रश्न मला अजिंक्य ने विचारला. ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आम्ही लहानपणापसून करायचो म्हणून तुला पण हे समजावे ह्या करता आपण किल्ल्यांची स्पर्धा पाहायला जाऊया असे बळेबळे तयार केले.

किल्ल्यांचे सादरीकरण हे मुळी एक प्रोजेक्ट होते. त्याची मोजमापे, त्यावरची हुबेहूब रचना दरवर्षी आम्ही हातानी केली त्यामुळे आम्हाला इतिहासाचा कंटाळा येत नाही आणि अजूनही जसेच्या तसे आठवते. आम्ही शिवाजी राजे आणि मावळे वर्षानुवर्षे कागदात फक्त पुढच्या वर्षीच्या किल्ल्या करता जपले नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष किल्ले जगलो. असे लंबे चौडे भाषण मी अजिंक्य ला सुनावले. शेवटी नको नको करत आमची जोडी किल्ले स्पर्धा बघण्यास गेली.


पुणे आणि किल्ले यांचे समीकरण आहेच त्यात हि स्पर्धा सकाळ समूहाने ठेवली होती. पालकांचा पण क्रियाशील सहभाग असायला परवानगी होती. नवीन मराठी शाळेत हि स्पर्धा होती. शाळेच्या दरवाजावरच छान असा शिवकालीन दिंडी दरवाजा केला होता. ढाल, तलवार यांच्या द्योताकासाहित भव्य अशी भवानी माता पाहून मन कधीच शिवरायान पाशी पोहचले. अजिंक्य हि ते वातावरण पाहून रमला होता. मला सार्थकी वाटले.

पुढे छान अशा मेण्यात शिवाजी राजे बैठक करून बसले होते. पारावर मेणा होता. त्यापाशी आई वर्ग ठिय्या ठोकून बसला होता, आम्ही विनंती केली, आम्हाला फोटो काढायचे आहेत जरा उठता पण आमचे म्हणणे त्यांच्या कानावर पडले नाहीच शेवटी तसेच फोटो काढले. मी अजिंक्यच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे टाळले. पण त्याने विचारले, आई ह्यांना रिस्पेक्ट देता येत नाही का?? माझ्या मागे परदेशी नागरिक होते, मी मागे वळून पहिले तर ते त्रस्त चेहऱ्यानी पुढे निघून गेले.

मैदानात सहभागी किल्ल्यांचा लक्षणीय आकड्यात प्रतिसाद होता. जणू काही शिवरायांचे किल्ले अंगण लुटुपुटूची लढाई, मोहिमा पार पडण्यास सज्ज झाले असावे. रायगड, राजगड, जंजिरा….. अनेक किल्ले आपापली जागा लक्ष वेधून घेत होते. कोणाचा खापरी लाल रंग, कोणाचा कडक शिष्तीचा करडा रंग, तर काळाकभिन्न रंग कणखर महाराष्ट्राचे वैभव लेऊन खाणाखुणा जपत होता. गडावर बाजारात मिळणारे मातीचे मावळे आणि आजूबाजूची गावठाणे खूपच छान वाटत होती. छोट्या छोट्या किल्लेदारांची उपस्थिती दुसऱ्या दिवशी नव्हती त्यामुळे मालक किल्लेदारविणा परिसर सुना सुना वाटत होता.

किल्ले बनण्यासाठी प्रसिद्ध इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन मुलांना दिले गेले होते. कल्पना खरच चांगली होती पण दोन दिवसांनी त्या किल्ल्याच्या रचनेला तडे जातात, त्यावर परिसराचा कचरा पडतो. प्रदर्शनाच्या वेळी तेथील मुलांचे समालोचन असावयास हवे, आम्ही आळीपाळीने वेळा वाटून आमच्या किल्ल्याचे संरक्षण करत असू. पानिपतची लढाई त्याचा लाईट आणि म्युझिक शो पण ठेवला होता. मग जी स्पर्धा आपण मांडली त्याचे चित्रीकरण दाखवावे. एखादे मूल हे पाहून प्रेरणा निश्चित घेवू शकेल.


सध्याच्या काळात रेडीमेड किल्ले मिळतात. त्यावर मातीचे तयार असलेले मावळे, भाजीवाली, पाण्याला जाणारी स्त्री, विहीर, संत मंडळी, सैनिक सर्व काही तयार मिळते. काहीच माहिती नसण्यापेक्षा हे हि चांगलेच आहे असा जरी सकारात्मक विचार केला तरी, मोठे झाल्यावर एकदा तरी स्वतःच्या हातानी किल्ला मुलां बरोबर बनवायला हवाच. स्वतःच्या हाताने बनवलेले किल्ले जेंव्हा जपले जातील तेंव्हाच खऱ्या किल्ल्यावर गेल्यावर आपण आणि पुढची पिढी पण ऐतिहासिक वारसा निश्चित जपेल.

सकाळ समूहाने किल्ले करणे ह्या संस्कृतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा आणि स्पर्धा आयोजित करून परंपरा जपली आहे. अशा स्पर्धेच्या काळात मुलांनी जास्ती वेळ तेथे उपस्थित असावयास हवे असे निश्चित पणे सांगितले असणार. मुलांची आणि पालकांची पण जवाबदारी आहेच. आपल्याला जर उत्तेजन दिले जात आहे तर त्याचा सर्वंकष बाजूने विचार सर्वांनी करावयास हवा. प्रयत्न स्तुत्य आहेच गरज आहे अधिक नियोजनाची.

सकाळ समूह दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करून सर्वाना सहभागी करून घेतात त्या बद्धल अभिनंदन आणि धन्यवाद कारण आमच्या सारख्या भारता बाहेर दूर गेलेल्यांना आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढीला दाखवता तरी येतो. हि माहिती मी इथल्या सर्वाना कळावी आणि त्यायोगे किल्ले सर्वांपर्यंत पोहोचावे. काही माफक अपेक्षा ठेवून आणि आपले कौतुक ह्या पोस्ट द्वारे …. शिवरायांपाशी समर्पित.

ओमानचा चाळीसावा राष्ट्रीय दिवस…………

मरहब्बा… आपले स्वागत

पोर्तुगीज राजवटीला कळून चुकले होते कि, भारताच्या मसाल्याच्या व्यापाराकरता ओमान हे एक चांगले बंदर म्हणून उपयोगात येईल. पोर्तुगीज राजवटीच्या अमलाखाली ओमान होते. कालांतराने १६४६ मध्ये ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने ओमान च्या संस्कृतीला आणि धर्माला जपले जाईल असे आश्वासन दिले आणि १८ नोहेंबर १६५० मध्ये ओमान स्वतःच्या हक्कासकट स्वतंत्र झाले. सद्य आदरणीय सुलतान ह्यांनी चाळीस वर्षापूर्वी ह्या दिनाची सुरवात केली आणि तेंव्हा राज्य कारभाराला सुरवात केली तेंव्हा पासून राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. sultan, Qaboos बिन सैद यांचा १९ तारखेला येणारा वाढदिवस म्हणून पण हा दिवस या दुहेरी आनंदा करता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे एक सोहळा असतो आणि तो साधारण पणे महिना भर तरी चालतो.

रस्त्यांच्या दुतर्फा फुलांची झुडुपे लावून गालीच्या तयार करतात, रस्त्यावर आकर्षक अशी रोषणाई असते. अत्यंत नयनरम्य असे वातावरण असते. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय असा फटाक्यांच्या आतषबाजीचा पण आवाज विरहीत असा सोहळा रात्री उशिरा पर्यंत देशाच्या अनेक भागात आयोजित केला जातो. रस्त्याच्या दुतर्फा आणि अनेक ठिकाणी राजाचे म्हणजे सुलतान चे मोठे मोठे फोटो अत्यंत आदराने लावले जातात.

ओमान मध्ये सुलतान हे खूपच लोकप्रिय आहेत. बराचसा कारभार मंत्रीगण पाहतात. ओमान हा एक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण, स्वतःची संस्कृती, परंपरा असलेला देश आहे. इतर देशांच्या संकृतीचा आदर केला जातो. ओमान चा झेंडा आणि त्यावरचे रंग यांची आकर्षक अशी उत्पादने येथे मिळतात. पारंपारिक खेळ आणि आधुनिक खेळ यांचा सुरेख कार्यक्रम येथील वैशिष्ट्य आहे. बर्फाचे स्केटिंग येथे उपलब्ध आहे तसेच उंटाच्या शर्यती पण बघण्यासारख्या असतात .

अतिशय शांत, प्रदूषण विरहित आणि नयनरम्य असे ओमान अनेकांचे लाडके ठिकाण पर्यटनासाठी आहे. मस्कत मध्ये १८ नोव्हेंबर नावाचा स्ट्रीट पण आहे. तेल व्यवसाय हा प्रमुख आहे. येथे दुबई सारखी जीवघेणी स्पर्धा नाही. ओमान च्या नागरिकांसाठी येथे नोकरीत आणि व्यवसायासाठी खास आरक्षण आहे त्यामुळे घरचे बेकार अशी परिस्थिती येथे नाही. आज ओमान मध्ये ब्रिटन ची राणी भेट देण्यास येत आहे. ब्रिटन बरोबर ओमान चे व्यावसायिक संबंध आणि मैत्री खूपच सलोख्याची आहे.

येथील करन्सी रियाल आहे. ह्या वर्षी वीस रियाल च्या नोटेचा रंग पूर्वी लाल होता तो निळ्या रंगात बदलला. ओमान ने आपली स्वतःची अशी संस्कृती टिकवली आहेच आणि ती छान जपली पण आहे.

राष्ट्रीय दिनानिमित्त येथे सरकारी सुट्टी दिली जाते. येथे ह्या दिवसाची सुट्टी नंतर पण दिली जाते. गुरवार आणि शुक्रवार ह्या वीकांत च्या सुट्टी ला जोडून हि सुट्टी घेतली जाते. राजाने झेंडा फडकवण्याचे किंवा मिलिटरी ची परेड हि सामन्यांना पाहण्यास मिळत नाही. राष्ट्रीय गीत येथे जाहीरपणे ऐकवले जात नाही. विमान कौशल्य सर्वाना पाहण्यास मिळते ते पण तुम्ही समुद्र किनारी जाऊन बसायचे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही. मिलिटरी चे जाहीर प्रदर्शन येथे नाही.

ओमान चे सर्वच देशांशी सौहार्द्य पूर्ण संबंध आहेत. मुळात अतिशय शांत वृत्ती येथील लोकांचा मूळ गाभा आहे. रस्त्यांच्या दुतर्फा अत्यंत योजना पूर्व दिव्यांच्या माळांचे आणि विविध आकाराचे नयनरम्य सजावट केली जाते. ह्या सजावटी करता प्रत्येक वर्षी एक थीम असते. ह्या वर्षी फुले आणि वाद्ये यांचा सुरेल सुवासिक मेळ विद्युत रोषणाईत दिसून येतो. विद्युत रोषणाई हि मोहक असते डोळ्यांना अजिबात दुखापत पोहचत नाही.

भारताशी तर फार पूर्वी पासून व्यापार उदीम चालत असे. बटाटा, बाबा, तवा, आंबा, असे अनेक शब्द भारत आणि ओमान च्या मैत्री चे द्योतक आहेत कारण इथे बरेचसे शब्द समान आहेत. भारताच्या संस्कृती बद्धल आदर आहे. येथे सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे, मंदिरे वैगरे आहेत. निसर्गाने परिपूर्ण, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, शांत, काटेकोर सुरक्षा व्यवस्था, सर्वांच्या धर्माबद्धल आदर , ईत्यादी गुणांनी संपूर्ण असेलेले ओमान हे इथे येणाऱ्या सर्वांचे लाडके होते.

ओमान ने आपला चाळीसावा राष्ट्रीय दिन साजरा केला त्या बद्धल कर्मभूमी असल्याने माझे हि हे थोडेसे योगदान ओमान साठी….. आपल्या सर्वांसाठी.

शुक्रान…..धन्यवाद

Previous Older Entries