माय मराठी…………..मोठी मराठी.
काही खरेदी करण्यासाठी मी ‘ कॅरे फोर’ ह्या मॉल मध्ये गेले होते. मी व हे वस्तू घेण्यासाठी मराठीतून चर्चा करत होतो.तिथल्या सेल्स मन शी इंग्लिश मध्ये शंका विचारात होतो. अचानक तो मराठीत बोलला,” हे घ्या चांगले आहे”. माणूस ‘मल्याळी’ शुद्ध मराठी बोलतो. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, मुंबईत नोकरी करण्यासाठी माझे आजोबा आले होते.आमची तिसरी पिढी. चांगले आहे, मराठी सक्तीचे करतात त्यानिमित्ताने मराठी बोलणे सुधारते. मी काही मल्याळी बोलू शकत नाही. त्यामुळे ह्या संस्कृतीशी परिचय होऊ शकला नाही.
तामिळनाडू, मध्ये हिंदी पण बोलत नाहीत. पण ती माणसे मुंबईत आली कि मराठी शिकून घेतात, हिंदी चा सराव पण त्यांना होतो. मुंबईत कारखाने उभारून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या,त्या कारखान्यातून मालक, व इतर कर्मचारी संपूर्ण देशातून आले. इथे अनेक तमिळ असे आहेत की आवर्जून मराठी बोलतात. हिंदी पण बोलतात.
भाषा च्या ह्या घनघोर युद्धात मी मात्र दुसरी कुठलीही भारतीय भाषा बोलू शकत नाही. आज मुंबईत पावलोपावली गुजराथी माणूस आहे. वाणी आहे. तो गुजराथ सोडून इकडे आला, त्याने मराठी बोललेच पाहिजे, तसा तो शिकला. सर्वांशी छान मराठीत बोलतो. माझा मराठी चा अभिमान सुखावतो. काही कामा निमित्त अहमदाबाद ला गेले. तेंव्हा जाणवले, मला गुजराथी समजते, पण घडाघडा बोलता कुठे येते.
राष्ट्र भाषा पण अस्खलित कुठे येते. मी माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधताना चुकून, ‘’अरे ये कितनीकू मिलता है. आपुनको नको’’. आता सांगा, धड हिंदी नाही, दुसरी भारतीय भाषा सराईत पणे बोलता येत नाही.आमच्या मराठी शाळा मुलांनी भराव्या म्हणून ‘खिचडी’ देवू ला गलो. ‘इंग्लिश’ मराठी माणसाला शिकावे लागते कारण जगाच्या व्यवहाराची ती भाषा आहे. त्याकरता शाळेत अभिनव उपक्रम राबवतो.
मराठीचे मात्र शुद्धलेखन सुद्धा पुढच्या आयुष्या करता कठीण होते. मराठी लिपी संगणकावर शोधतो. जे काही ज्ञान आमचे आहे, ते पाजळतो पण शुद्धलेखनाची साईट काही मिळत नाही. माझे काम मी चोख बजावतो, माझ्या ज्ञान, विश्वासावर मी दुसऱ्यांना हुशार करतो. मग सहज मिळेल अशी साईट तयार करा. आम्हालाही अभिमानच आहे. मराठी चा. प्रश्न शोधतो, चुका दाखवतो पण पर्याय तयार करत नाही. मी कशाला कोणीतरी करेल.
असा माझा भाषेचा घोळ आहे. मुंबईत ज्या प्रमाणात लोकसंख्या इतर राज्यातून येऊन स्थिरावली. तेव्हढी मराठी भाषा मोठी मोठी होत गेली. मुंबईत मी मराठीच बोलणार कारण भय्या असो, मल्याळी असो, नाहीतर बंगला देशी असू दे. त्यांनीच मराठी बोलले पाहिजे नसेल बोलायचे तर जा, आपल्या राज्यात परत. उगाच गर्दी करतात. मी असे बोलायचा अवकाश इथे पण ‘हे’ इतर आमच्याशी मराठी बोलतात. आपापसात त्यांच्या भाषेत बोलतात. हरकत नाही, माझ्याशी तरी मराठी बोलतात. केव्हढा दबदबा मराठीचा.
सात समुद्र पलीकडे पण मी मराठी…….अशी गर्जना करावी लागत नाही. पण माझ्या भाषा विकासाचे काय हा प्रश्नच राहतो. मल्याळी मराठीतून ओणम समजावून सांगतो. मी म्हंटले मला पण मल्याळी शिकायचे आहे. तर उत्तर येते, आम्हाला मराठी येते. आमचे मराठी चांगले होईल.
मी मग भारतीय भाषा शिकू का नको? कारण सगळे मराठी बोलू लागल्यावर मराठी च्या कक्षा विस्तृत होणार, मराठी मोठी भाषा होऊ लागली आहे. मस्कत मध्ये पण खूप ठिकाणी आम्ही मराठी बोलतो. आहे की नाही मराठी ची मज्जा. मराठी माणसे पण आवर्जून मराठी तून कशी आहेस? मी बरी. असे बोलून, इट इज सो हॉट टुडे. हे दुसरे वाक्य असते. मराठीतून मी ‘इंडियाला’ चालले असे सांगते, मल्याळी त्याच्या गावाचे नाव घेऊन सांगतो. मी माझे काम परदेशी करते आहे असे म्हंटल्यावर सहजीच ‘इंडिया’ असे येणार. मग हा मात्र मुंबई ला निघालात का? असे बोलतो. कारण त्याला त्याचे काम झाले की गाव आठवते. मी मुंबई मोठी झाली म्हणून खुश होते.
शाळेत फ्रेंच घेतो, संस्कृत च्या जवळची भाषा शिवाय परदेशी पण, भरपूर गुण देते. दहावी नंतर कशाला हवी? ‘गरज सरो……. असे आहे. पंजाबी, मल्याळी, तमिळ हा पर्याय नाहीच. आपापल्या राज्य भाषा शिका. दुसरी राज्य असे काही करीत नाहीत तर मराठी राज्यात का? प्रश्न बरोबर. पण अनेक भारतीय भाषा शिकले तर बिघडेल का? शिका तुम्ही कुठे ही, भारतात इतर भारतीय भाषा शिकवल्या जातात पण प्रमाण फारच कमी आहे. माझी तर शाळा संपली, जाऊ दे मला काय करायचे.
एक न धड…….असा माझा भाषा विकास खुंटला. मुंबई ला वित्त, व्यवसाय, उद्योग,ह्या करिता महानगर म्हणून जगात मानाचे स्थान आहे. अनेक अमराठी लोक इथे येऊन स्थिरावले, इथली संस्कृती शिकले. मराठी भाषा शिकून पिढ्यान पिढ्या राहतात. मराठी माणूस इतर भाषा शिकण्यास कमी पडतो का? इतर राज्यांमधून मुंबईच्या तुलनेत कमी मराठी लोक आहेत. की इतर राज्यांशी कमी संपर्क व्यवसाया निमित्त आहे.अंतर्मुख होवून विचार करते, मला गरज किती आहे? फारच कमी. जो येतो तो मराठी शिकतो.छान आहे मराठी विस्तृत होतीय. पण एक दिवस ह्यांच्या कडून मराठी शिकायला लागेल असे वाटते. जर कोणाला इतर भारतीय भाषा येत असल्या तर विकासाची प्रथम पायरी समजली जाते.राष्ट्र विकास होण्यासाठी भाषा संगम ला अनन्य साधारण महत्व आहे. नवीन भाषा म्हणजे एका संस्कृतीची ओळख, मैत्रीचे संबध विकसित होण्यासाठी हृदयाची भाषा शिकणे म्हणजेच अजून एका मातेची भाषा होय.
आता मी मस्कत ला अरेबिक सगळीकडे. माझ्या ओमानी शेजारणीला मी बटाटा, तवा, आंबा हे मराठीतून आम्ही असेच म्हणतो, कारण ही नावे इथे पण अशीच आहेत. हे हिंदीतून सांगते, तिला भारत माहिती आहे. तिला मुंबईत पाऊस एन्जोय करायला जायचे आहे. मला मराठी शिकव म्हणून मागे लागली आहे. शोप्स मराठीतून वाचायला यायला हवेत इतकी माहिती तिला आहे. इथे पण अरेबिक मध्ये आहेत म्हणून दुबई पेक्षा ग्रोथ कमी आहे. जाऊ दे मला काय? मला ओमानीना मराठी शिकवायला हवे.
‘म’………… माझ्या मराठी चा हे पक्के पाठ झाले आहे.